Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अनावश्यक खर्चाला व खोट्या प्रतिष्ठेला फाटा देऊन नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न – अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विवाह होणे ही काळाची गरज – प्रा. सुरेशदाजी बिराजदार

admin by admin
07/08/2021
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दल समाजात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्याबद्दल जनजागृती व्हावी व कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत अनावश्यक खर्चाला व खोट्या प्रतिष्ठेला फाटा देऊन उदतपुर येथील माजी सरपंच, एक प्रगतशील शेतकरी माधवराव पाटील यांनी त्यांचा मुलगा आत्माराम याचा विवाह नोंदणी पद्धतीने करून चिपळूण येथील पूरग्रस्तांकरिता आर्थिक मदत करता यावी यासाठी रक्कम दिली आहे.लोहारा तालुक्यातील उदतपुर येथील माजी सरपंच माधवराव पाटील यांचा मुलगा आत्माराम याचा विवाह धानुरी येथील प्रा. आनंदराव सूर्यवंशी यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी ठरला. विवाह नोंदणी पद्धतीने करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दोन्ही कुटुंबियांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार आत्माराम व ऐश्वर्या यांचा उस्मानाबाद येथे बुधवारी (दि.४) नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी नवरदेव आत्माराम यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद साळुंके, आण्णाराव पाटील, बापूराव पवार, गुंडेराव पवार, गोवर्धन मुसांडे, बालाजी पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिदास पवार, पत्रकार गिरीश भगत, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, दीपक गोरे, अजित पाटील, किरण चिंचोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माधवराव पाटील यांनी या नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दलची भूमिका विषद केली. यावेळी बोलताना माधवराव पाटील म्हणाले की, आपल्या समाजात खोट्या प्रतिष्ठेसाठी विवाहाच्या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी होते. परंतु या खोट्या प्रतिष्ठेपाई बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होतात. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेपाई विवाहात होणारी पैशांची उधळपट्टी खरंच आवश्यक आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आपल्या समाजात नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. सध्या कोरोनाकाळात कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी पद्धतीच्या विवाहाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी यासाठी हा विवाह नोंदणी पद्धतीने केला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, समाज काय म्हणेल या विचाराने विवाह मोठाच झाला पाहिजे असा समज झाला आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन या पद्धतीने विवाह होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाटील व सूर्यवंशी कुटुंबियांच्या या निर्णयाचे कौतुक करून पुढील काळात याच पद्धतीने विवाह होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन माधवराव पाटील यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट ला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच आनंदराव सूर्यवंशी यांनीही पूरग्रस्तांना मदत म्हणून २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. माधवराव पाटील यांना दोन मुले व दोन मुली आहेत. या सर्वांची विवाह त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने केली आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन माधवराव पाटील यांचे नातेवाईक आशुतोष घोगरे, अतिष पाटील, श्रीकांत पवार व सुमित सूर्यवंशी यांनी आम्हीही आमचा विवाह याच पद्धतीने व कसल्याही प्रकारचा हुंडा न घेता करणार असल्याचे जाहीर केले.

Previous Post

स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित करणारे महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील ! – डॉ. श्रीमंत कोकाटे

Next Post

नेमकं का दिले होते पुरस्काराला राजीव गांधीचे नाव ? वाचा सविस्तर

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post

नेमकं का दिले होते पुरस्काराला राजीव गांधीचे नाव ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's