वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
युनियन बँक ऑफ इंडिया लोहारा शाखेत २०२२ चा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे खरीप २०२२ चा पीक विमा देण्यात यावा अशी मागणी भातागळी येथील अमोल ओवांडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी (दि. २६) निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, युनियन बँक ऑफ इंडियाच्या लोहारा शाखेतील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ चा पीक विमा एकाही शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी भातागळी येथील अमोल ओवांडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी (दि.२६) निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर निवेदन दिले. यावेळी विष्णू नारायणकर, तानाजी आनंदगावकर, बाळू पाटील, मुकुंद जगताप उपस्थित होते.