लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयातील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयात रविवारी (दि. ४) सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुतीराव आंबेकर हे होते. यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बलसुरचे सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, संचालक माधवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, प्राचार्य एस. डी. कुलकर्णी, श्री बालाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु. जी. गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील प्रियंका दंडगुले, आदित्य पवार, अपेक्षा दलाल, श्रेया कांबळे या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनो सध्या स्पर्धेचे युग आहे. तुमच्यासाठी पुढील दोन वर्षे खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यशस्वी व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गोविंदराव साळुंके, सुनिल साळुंके, माधवराव पाटील, अमर बिराजदार आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राम मिटकरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात, व्यंकट राजपूत, देविदास पावशेरे, गजानन मिटकरी, अमोल थोरात, लक्ष्मण बिराजदार, निरंजन कुलकर्णी, कुमार कोरे, अमोल थोरात, बालाजी फुरडे, समाधान मनोहर, प्रवीण मनोहर, मधुकर कोळी, बापूराव पवार, गुंडेराव पवार, व्यंकट पवार, लखन राजपूत, किशोर हुडेकर यांच्यासह शिक्षक आर. टी. चेंडकाळे, प्रेमानंद निंबाळकर, बी. ए. घंटे, ए. सी. वाघमारे, एस. आय. आंबेकर, एम. एस. मिटकरी यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आर. टी. चेंडकाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.