लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
तालुक्यातील कानेगाव येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कानेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार प्रतिभा श्रीकांत कदम, भातागळी गणातील उमेदवार विनायक बारगळ, हिप्परगा गणातील उमेदवार अनिल मोरे यांच्यासह जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेखर पाटील, संजय लोभे, पंडित बारगळ, सलीम शेख, फुलचंद चौगुले, बालाजी लोभे, ज्ञानेश्वर लोभे, धीरज कदम, तानाजी मोरे, सतीश कदम, विवेक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामे करण्याकरिता आमच्या सर्वसामान्य उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.

तसेच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आहे हे म्हणणं तुम्ही बंद करा. कारण ईव्हीएम मध्ये बिघाड करता आला असता तर लोकसभेला मी एवढ्या मोठ्या मताने मी निवडून आलो असतो का असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. तसेच मतदान केंद्रावर सकाळी लवकर जाऊन मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन चेक करून दाखवली जाते. त्यावेळी तेथे उपस्थित राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अजित चौधरी, शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेत लोहारा खुर्द येथील उपसरपंच सचिन बाळू रसाळ यांच्यासह युवकांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. या सभेसाठी महिला व नागरिक उपस्थित होते.









