Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महान क्रांतिकारक – दत्तोबा भोसले मातोळकर

admin by admin
17/09/2022
in मराठवाडा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आजच्या पिढीला, तुम्हाला आम्हाला या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा इतिहास माहिती आहे का. खरंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण मराठवाड्यात राहणारे लोक त्यावेळी ही पारतंत्र्यात होते. १७ सप्टेंबर १९४८ म्हणजेच स्वातंत्र्याच्या १३ महिन्यानंतर मराठवाड्यात राहणाऱ्या लोकांनी मोकळा श्वास घेतला. जुलमी निझाम आणि रझाकरांच्या तावडीतून सुटून आपण अखंड भारताचा भाग झालो. हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती असेल. आपल्या देशात स्वातंत्र्यसैनिक म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग हे जेवढे महत्वाचे आहेत अगदी तेवढेच महत्वाचे स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, कॅप्टन जोशी, आ क्रू वाघमारे, केशवराव कोरटकर, वामनराव नाईक आणि यांच्यासारखेच मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात लढलेले स्वातंत्र्य सैनिकही आहेत.


क्रांतीवीर दत्तोबा भोसले हे नाव घेतल्याशिवाय मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. दत्तोबा भोसले हे त्या काळातील उच्चशिक्षित तरुण होते. त्यांनी बडोद्याच्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. महाराज सयाजीराव गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकार्याने शिक्षण, क्रांतीचे धडे घेतले. दत्तोबा भोसले यांच्या जेल डायरीवर एक नजर टाकली की त्यांचे व्यक्तिमत्व किती मोठे होते हे लक्षात येते. त्यातून असं लक्षात येत की, त्याही वेळी ते समानतेचा, मुलींच्या हक्कांचा, आणि शिक्षणाचा पुरस्कार करत असत. सर्वधर्मीयांना समानतेने वागवत असत. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक विधायक कामे केली. मराठवाड्यातील बालविवाह बंद पाडण्यात देखील दत्तोबा भोसले यांचा मोलाचा वाटा होता. दत्तोबा हे कुस्ती पटू देखील होते. १९४२ ते ४६ दरम्यान त्यांनी राष्ट्रीय किताबही जिंकले. त्यावेळचे गव्हर्नर लिनलिथगो यांच्या हस्ते दत्तोबा भोसले यांचा गौरव करण्यात आला होता. दत्तोबा भोसले यांचा मातोळा येथून सुरू झालेला प्रवास बडोदा येथे येऊन पोहोचला. आणि बडोद्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःला घडवलं. बडोद्यामध्ये त्यांची मैत्री राजारामबापू पाटील यांच्याशी मैत्री झाली. आणि मग राजारामबापू पाटलांनी दत्तोबा भोसले यांन क्रांतिसिंह नाना पाटील यांची ओळख करून दिली. महान विचारांच बाळकडू घेऊन दत्तोबा भोसले बडोद्याहून जेंव्हा मराठवाड्यात पोहोचले तेंव्हा सुरू झाला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा. आणि उच्चशिक्षित दत्तोबा ठरले निजामाचा कर्दनकाळ. रझाकरांचा नायनाट करण्यासाठी लढणारा दत्तू भोसले आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कधी गनिमी काव्याने तर कधी उघडपणे त्यांनी रझाकरांशी दोन हात केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते रझाकारांशी लढत राहिले. वाऱ्याच्या वेगाने, विलक्षण चपळाईने तर कधी बेमालूम वेषांतर करून दत्तोबा यांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडलं. सेलू येथील सरकारी खजिन्याची लूट असो किंवा देवताळा येथील १५० रझाकारांचे केलेले शीरकांड असो किंवा नाईचाकूर पोलीस ठाण्यावर केलेला हल्ला या प्रत्येक घटनेमागे दत्तोबा भोसले यांचा हात होता. १९४८ ला उस्मानाबाद चे कलेक्टर असणाऱ्या महंमद हैदर यांनी लिहिलेल्या ऑक्टोबर कुप मध्ये दत्तोबा भोसले यांच्या कार्याबद्दल उल्लेख आहे. यात त्यांनी दत्तोबा भोसले यांना ‘मातोळा डेव्हिल ऑन हॉर्स बॅक अशी उपाधी दिली आहे.


निझाम आणि रझाकारांच्या मनात मराठवाडा सोडेपर्यंत दत्तोबा भोसले यांची दहशत होती. दत्तोबा भोसले यांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या अविरत प्रयत्नांमुळे मराठवाड्यात राहणारे आपण मोकळा श्वास घेत आहोत. १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दत्तोबा भोसले यांनी सामाजिक सुधारणांसाठी अनेक विधायक कामे केली. स्त्री पुरुष समानता, सर्वधर्मीयांच्या समानतेसाठी कामे केली. स्त्रियांचे शिक्षण, विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून कामे केली. कर्मकांडाला विरोध केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दत्तोबा भोसले यांनी स्वतः केलेल्या कामांचं, लढायांचं कुठेही स्तोम माजवल नाही. यातच क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचं वेगळेपण होते.
ज्यांना स्वतः चा इतिहास माहित नसतो त्यांच्याकडून भविष्याच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं. भविष्याची बिजे भुतकाळात प्रेरणेच्या रूपात दडलेली असतात. म्हणून चिंगारी जिवंत ठेवली तर मशाल पेटवायच्या वेळेला आपसूकच अवसान येतं अन् हर हर महादेवची आरोळी आमच्या नसानसात दवडू लागते. तलवारीचा खणखणाट, घोड्याच्या टापांचा अन् ढोलताशाच्या थापांचा,युध्दाचा, चित्कारांचा, विद्रोहाचा, बलिदानाचा, स्वातंत्र्याचा ,त्यागाचा भयाण इतिहास गाजला गेला.
उस्मानाबादच्या तेरणेच्या खोऱ्यात तडोळा, काजळा, सारोळा, उपळा, वाघोली, कनगरा, आशिव, मातोळा, सास्तूर, ढोकी,आळणी, या भागातल्या शेकडो गावांना रजाकाराच्या जुलमी अत्याचरापासुन क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांनी प्राणाची पर्वा न करता १९४८ साली मुक्त केले. शेकडो गावे निजामापासून मुक्त करून मुक्तापूर स्वराज्य निर्माण करून चिंचोली या गावाला राजधानी घोषीत केली. दत्तोबा भोसले यांचा इतिहास हा तेरणेच्या खोऱ्यातल्या अप्रकाशित काळोखात जिज्ञासूंची अन् कृतज्ञवंतांची वाट पहात उभा आहे. ह्या लढ्याचा नायक म्हणजे मातोळ्याचे क्रांतिविर दत्तोबा भोसले, ज्यांच्या कथा जात्याच्या पाळूपासून ते चावडीचावडीपर्यत सांगितल्या जातात. ज्यांना पकडण्यासाठी निझामाने लाखोचे बक्षिस ठेवले होते. अनेक सापळे रचले गेले पण ते सापडले नाहीत. वेशांतर करण्यापासून ते पांढऱ्या घोडीवर वाऱ्यासारखे धावणारे ,सशस्त्र तरूणांची फौज उभी करणारे दत्तोबा भोसले एक अख्यायिका बणले आहेत.
या लढ्याला शिक्षणाचीही किनार आहे. दत्तोबा भोसले म्हणजे लोहाऱ्या जवळच्या हिप्परगा गावातील स्वामी रामानंद तिर्थ मुख्याध्यापक असलेल्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी. शिक्षणाच्या प्रचंड आवडीतून त्यांना राष्ट्रवादाचे धडे मिळाले. नंतर त्यांना हरीभाई देवकरण हायस्कुल, सोलापुर येथुन मॅट्रीकचे शिक्षण पुर्ण केले. पुढे ते ज्ञानर्जनासाठी सयाजीराव गायवाडांच्या आश्रयाला बडोद्याला गेले. तिथे सयाजीरावांनी स्थापन केलेल्या प्रो राजरत्न माणीकराव यांच्या आखाड्यात कुस्तीचे कित्ते गिरवले व ते त्यांचे पट्टशिष्य झाले. स्वतः महाराजांसोबत कुस्ती खेळण्याची संधी दत्तोबा भोसले यांना भेठली. त्यांनी संपुर्ण देशभर कुस्तीत वेल्टरवेट व फेदरवेट गटात चॅम्पीयनशीप मिळवली. त्याकाळचे प्रसिद्ध जागतीक मल्ल गामा, गुंगा व इमामबक्ष यांच्या बरोबरच्या कुस्त्या गाजल्या. या काळचे गव्हर्नर जनरल लाॅर्ड लिनलिथगो यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. रजाकाराच्या पाशवी अत्याचाराच्या कहाण्या त्यांच्या कानावर पडु लागल्या त्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी मराठवाड्यात परतले. तालमीत आत्मविश्वास घेवून लढाईसाठी सज्ज झालो होतेच. ओठावर क्रांतीचा जयजयकार, त्यांच्या आवाजातली जरब अन् डोळ्यातल्या तेजाने रझाकार थरथरा कापत असत. तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याचे शिक्षण त्यांनी चिंचोली – बार्षी भागातल्या कैंपवर तरूणांना दिले. शेकडो रझाकार कापुन काढले. सेलु गावचा शेतसारा लोहाऱ्यात जात असताना लुटला. सशस्त्र हल्ली करुन नाईचाकुर पोलीस ठाण्यातुन शस्त्रास्त्रे लुटली. तरूणांच्या फलटनी निर्माण करुन अनेक कॅम्प उभे केले. कारागृहात त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीतले लेख त्यांच्या राष्ट्रवादाचे देशभक्तीचे अन् गुलामगिरीविरूध्द विषमतेविरूध्द त्यांचा कल स्पष्ट करणारे आहेत.


दत्तोबा भोसले यांचा जन्म औसा तालुक्यातील मातोळा या गावी १९ नोव्हेंबर १९१८ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण मातोळा गावी ऊर्दू माध्यमातून झाले. शिक्षण, व्यायाम आणि कुस्ती खेळण्यात दत्तोबांचा हातखंडा होता. दत्तोबांंचे माध्यमिक शिक्षण हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत झाले. तेथेच त्यांची स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सहवासात जडणघडण झाली. राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. श्री. चंद्रशेखर वाजपेयी, श्री. विश्वंभरराव हराळकर, श्री. देविसिंह चौहान, श्री. नारायणराव लोहारेकर आदी त्यांचे सहाध्यायी होते. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे “हा दत्तोबा भविष्यात शूर निघेल.” हे उद्गार स्वामी रामानंद तीर्थ यांनी काढले होते आणि भविष्यात ते खरे ठरले होते.

————
दत्तोबा भोसले यांचे सामाजिक व राजकीय विचार (जेल डायरीतून)

लोककल्याणाचा एकच राजमार्ग म्हणून दाखविणे इतके हिंदुस्तानचे भावी सौख्य आज एकदेशीय नाही. एकीकडे राजकीय सामाजिक सुधारणा आहेत. धर्म उद्योग शिक्षण आहे. स्त्रियांचा प्रश्न आहे. तसेच अस्पृश्यांचा ही प्रश्न आहे व जातिभेदाचाही गोंधळ आहे अशा या चमत्कारिक परिस्थितीत अमुक एकच मार्ग इतरांपेक्षा चांगला आहे, असे सांगणे मोठे धाडसाचे आहे. परिस्थितीच्या अनुभवाप्रमाणे या विषयावर ज्याचे त्याचे विचार अगदी निराळे झाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितकी मतं, आणि मतं तितकी मार्ग असा प्रकार होऊन आज जबाबदार आणि बेजबाबदार अशा सर्वच लोकांना बारा वाटा मोकळ्या होऊन बसल्या आहेत. आपल्याहून भिन्न रीतीने लोकहिताचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याच्याबद्दल सहानुभूती न दाखविणे, देशहिताच्या विचाराताच स्पर्धा वाढवून एकमेकांना खाली पाडणे, दुसऱ्याच्या प्रयत्नांबद्दल अनादर दाखविणे या कारणांमुळे आज देशाची इतकी अवनती होत आहे. तितकी दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे होत नसेल.
————-
मराठवाडा मुक्तीसंग्रामावर जे निरनिराळी पुस्तके व इतिहासपर सामग्री लिहिली गेली ती वाचल्यावर मन खिन्न झाले. दत्तोबा भोसले यांना यथोचित न्याय मिळाला नाही ही भावना झाली. जिथे मातोळा हे दत्तू भोसलेचे मातोळा म्हणून ओळखले जाते, जिथे त्यांच्यावर गावोगावी पोवाडे गायले जातात, त्यांच्या बहादुरीचे, कुस्तीतले, रझाकराला यमसदनी पाठविलेले किस्से अभिमानाने सांगितले जातात त्या बहाद्दर क्रांतीविराचे मूल्यमापन व उचित गौरव झाला नसल्याचे स्पष्ट जाणवले. पण कोणाला दोष देत बसता येणार नाही. बहुतेक त्यांना त्यांचे कर्तुत्व माहीत नव्हते किंवा माहीत करून घ्यायचे नव्हते. ज्याच्या हाती लेखणी त्यांनी इतिहास लिहिला. काही स्वातंत्र्यसैनिक जसे देवीसिंह चौहान, उद्धवराव पाटील, अनंत भालेराव, गोविंदभाई, चारठाणकर हे राजकारण, वृत्तसंपादनात पुढे आले व त्यांना व्यासपीठ मिळाले. त्यांचा यथोचित सन्मान व गुणगौरव वेळोवेळी होत गेला असे वाटते. दत्तोबा भोसले यांनी मुख्य भर, लक्ष फक्त मुलांवर शिक्षणावर व समाजकारणावरच केंद्रित केले होते. त्यांनी सन्मानपत्र सोडले तर कधी हयातीत पेन्शन साठी अर्ज केला नाही किंवा आपली महता गायली नाही. म्हणूनच त्यांची कर्तबगारी दुर्लक्षित राहिली गेली. आमच्या वडिलांची महती कर्तबगारी व बहादुरी ही मुख्यत्वे करून दुसऱ्या लोकांकडूनच जास्त ऐकली. जिथे जात होतो तिथे संपूर्ण मराठवाड्यात व बडोदा येथेही त्यांच्याविषयी खूप गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्टी कानावर पडायच्या. ते स्वतःहून क्वचितच ह्या गोष्टी सांगायचे. त्यांचे सर्व लक्ष व शिकवण ही आरोग्य व शिक्षण ह्यावरच असायचे. सर्व भाऊ बहिणींचे शिक्षण घरातच करून थेट चौथी बोर्डालाच परीक्षेला बसवायचे. त्यांचे इंग्रजी अस्खलित असल्यामुळे पाचवीला असतानाच आम्ही सर्वांनी पूर्ण शुद्ध व्याकरणासहित इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व क्रांतिवीर नाना पाटील यांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. तो त्यांच्या जेल मधून लिहिलेल्या डायरी वरून कळते.

– विवेक दत्तोबा भोसले (दत्तोबा भोसले यांचे सुपुत्र)

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दत्तोबा भोसले मातोळकरमराठवाडा मुक्तीसंग्राम
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांग बालक मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, लोहारा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप

Related Posts

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर
मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

02/10/2024
मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप
मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

21/03/2024
मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

03/08/2023
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, लोहारा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506618

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!