ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (savitribai phule) यांच्या स्मृती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले सखी मंच व महात्मा फुले (mahatma phule) युवा मंच लोहारा (lohara) यांच्या वतीने शहरातील शिवनगर येथे नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका शामल माळी होत्या. तसेच यावेळी माळी समाजातील सोमनाथ रामराव क्षिरसागर (अभिलेखापाल भूमी अभिलेख जिल्हा बुलढाणा), सुरज भालचंद्र क्षिरसागर (सहाय्यक स्थापत्य अभियंता सा.बा. विभाग महाराष्ट्र), विद्याराणी दत्तात्रय क्षिरसागर (कनिष्ठ लिपिक जिल्हा परिषद लातूर) व स्वाती मनोरथ भोजने (सहशिक्षक निवड जिल्हा परिषद धाराशिव) या चौघांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल यांचा लोहारा माळी समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका शामल माळी, गटनेत्या सारिका बंगले, नगरसेवक अविनाश माळी, अभिमान खराडे, राजेंद्र माळी, नगरसेविका सुमन दिपक रोडगे, माजी जि.प.सदस्या मिरा अविनाश माळी, नगरसेविका शमाबी आयुब शेख, आरती सतिश गिरी, संगिता किशोर पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, आयुब अब्दुल शेख, दिपक रोडगे, सुग्रीव माळी, सिद्धेश्वर माने, इकबाल मुल्ला, दगडु तिगाडे, के.डि. पाटील, श्रीनिवास माळी, दत्ता मोरे, राजेंद्र क्षीरसागर, सतिश माळी, अमोल माळी, इंद्रजित माळी, सुग्रीव माळी, अशोक क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, प्रा.डि.एन.कोटरगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, श्रीकांत माळी, बाळु माळी, सोमनाथ भोजणे, अशोक काटे, बबन माळी, आदिनाथ फुलसुंदर, सतिश गिरी, गणेश फुलसुंदर, शंकर माळी, पंडित माळी, सचिन करे, विद्यासागर माळी, संतोष क्षीरसागर, मनोज भोजणे, अशोक काटे, शरण माळी, दिनेश माळी, संतोष क्षीरसागर, श्रीकांत माळी, शशांक माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, भगवान माळी, राम क्षिरसागर, बालाजी माळी, बंटी माळी, आत्माराम फुलसुंदर, भालचंद्र क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर, बालाजी बाभळे, शाम माळी, गणेश गोरे, मनोरथ भोजणे, महादेव डावखरे, अमोल डोकले, मंगल क्षीरसागर, गीतांजली क्षीरसागर, प्रणिता क्षीरसागर, सुनंदा क्षीरसागर, निर्मला क्षीरसागर, जयश्री क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर, सुजाता क्षीरसागर, माया क्षीरसागर, गुरुदेवी माळी, मनिषा माळी, महादेवी माळी, रुतुजा माळी, भाग्यश्री काटे, स्वाती भोजणे, माधुरी गवळी, घंटे मॅडम, सुनिता फुलसुंदर, राधा फुलसुंदर, विद्याराणी क्षीरसागर, आर्या फुलसुंदर, आदीती फुलसुंदर, भाग्यश्री फुलसुंदर, आराध्या फुलसुंदर, सीमा काटे यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुरज क्षीरसागर, स्वाती भोजणे, आदिती फुलसुंदर, आर्या फुलसुंदर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक क्षीरसागर यांनी तर राजेंद्र क्षीरसागर क्षीरसागर यांनी आभार मानले.