लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी (दि.९) गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यु. व्ही .पाटील मॅडम या होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण व डॉ. गुणवंत वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक महाराष्ट्र गीताने झाली. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील बहिरे यांनी केले. महाविद्यालयाचा इतिहास व विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेचा १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आहे.
प्रथम आलेली अश्विनी हणमंत रसाळ (९३ टक्के), द्वितीय आलेली अस्मिता अमोल शिवकर (९२.४० टक्के) व तृतीय आलेली सपना नेताजी भोकरे (९२ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेतून प्रथम आलेल्या अश्विनी हनुमंत रसाळ या विद्यार्थिनीला प्राचार्या यु. व्ही. पाटील यांच्या वतीने रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. यानंतर १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेतून प्रथम आलेली श्रुती बालाजी पाटील (८५.६७ टक्के), द्वितीय आलेली निहा मुकरम मणियार (८३.६७), तृतीय आलेला प्रतीक राजेंद्र माळवतकर (८३.३३), वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली अंकिता भुजंग जावळे (८८ टक्के), द्वितीय निखिल नानासाहेब गोरे (८४.८३ टक्के) व तृतीय क्रांती काकासाहेब सूर्यवंशी (७८.१७), कला शाखेतून प्रथम कीर्ती तुषार चव्हाण (८०.३३ टक्के) द्वितीय फरहाना फिरोज पठाण (७८.६७ टक्के) व तृतीय अंकिता गुणाजी बनसोडे (७७.३३ टक्के) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रतीक राजेंद्र माळवदकर या विद्यार्थ्याने फिजिक्स या विषयात ९४ टक्के गुण घेतल्यामुळे प्रा. राजेंद्र साळुंके यांच्या वतीने ५०० रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. कै. गणपतराव काळे यांच्या स्मरणार्थ प्रा. प्रशांत काळे यांच्या वतीने कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येकी एक हजार रुपये व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांस पाचशे रुपये रोख पारितोषक प्रदान करण्यात आले. कै. मुरलीधर महाराज यांच्या स्मरणार्थ प्रा. विद्यासागर गिरी यांच्या वतीने मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४ मध्ये इयत्ता आठवीतील वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाल. त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. एमटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी भक्ती गोविंद कोकाटे हिचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाणिज्य शाखेतील अकाउंट या विषयात पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण घेतल्यामुळे प्रा. विजय उंबरे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले. डॉ. गुणवंत वाघमोडे यांनी बिकट परिस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन शिंदे यांनी तर श्रीकांत मोरे यांनी आभार मानले. यावेळी भास्कर जाधव, प्रा. एल. पी. कुलकर्णी, प्रा. विद्यासागर गिरी, बालाजी ईरुदे, डी. आर. जाधव, नागनाथ पांढरे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. आर. सी. अष्टेकर, प्रा.आर. डी. साळुंके, प्रा. उध्दव सोमवंशी, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. डी. आर. साठे, प्रा. बालाजी सूर्यवंशी यांच्यासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.