मराठा समाजाला ओबीसीमधून (obc) आरक्षण मिळावं यासाठी मराठा (maratha) योद्धा मनोज जरांगे-पाटील (manoj jarange patil) आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव आगामी लोकसभा (loksabha) व विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार घालणार असून कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या कार्यक्रमात सहभागी तथा प्रतिसाद देणार नाही असा निर्णय लोहारा तालुक्यातील होळी ग्रामस्थानी शनिवारी (दि.२) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला आहे.
मराठा समाजास मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण (reservation) मिळेपर्यंत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर संपूर्ण गावाचा बहिष्कार असेल. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही व गावात कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी आला तर कोणीही प्रतिसाद देणार नाही. या बैठकीमध्ये मराठा समाजाची कोअर कमिटी तयार करण्यात आली. त्यांनी घेतलेले निर्णय सर्व समाजास लागू राहतील व आगामी लोकसभा निवडणुकीत गावच्यावतीने दोन ते तीन उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेतला आला आहे. तालुक्यातील होळी गावात संपन्न झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत वरील विषयावर
एकमत झाले आहे. मराठा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र महारुद्र जाधव, सचिव अजित माधवराव जाधव, उपाध्यक्ष युवराज गोविंद कोकाटे, सदस्य राम प्रभाकर जाधव, प्रा. गोविंद जाधव, संजय ओमप्रकाश मनाळे, संजय इराप्पा बिराजदार, संजय भीमा कांबळे, व्यंकट सिद्राम माळी, बालाजी मडोळे, लक्ष्मण राठोड, केशव भानुदास सरवदे, माधव जमादार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.