1 जुलै रोजी वृक्षदिंडी व वृक्षलागवड अभियान आयोजित करण्यात आले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व निसर्ग सवंर्धनाच्या अनुषंगाने वृक्ष लागवड अत्यंत महत्वाची आहे. वृक्ष केवळ आपले जिवण प्रभवीत करतात असे नव्हे, तर आपले अस्थितीत्व सुरक्षित करण्यासाठी सजवंनी प्रधान करतात. हीच गरज लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन उस्मानाबाद सारख्या दुष्काळी जिल्ह्यात 10 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा एक भाग म्हणून उद्या दि.01.07.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्यालय, उस्मानाबाद येथे सकाळी 7.30 वा. सु. तसेच जनता विद्यालय येडशी व राष्ट्रीय महामार्गालगत येडशी टोल नाका येथे सकाळी 08.00 ते 09.00 वा. दरम्यान वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापुर यांच्या वतीने उद्या दि.01.07.2023 रोजी दुपारी 4.00 वा. सु. जनते मध्ये वृक्ष लागवडी बाबत जनजागृती करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते वृक्षदिंडी काढून पर्यावरणपुरक अशा वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर चे उप संचालक, मा. प्रो. रमेश जारे, श्री. गणेश चादरे, तसेच श्री. देशमुख RO सामाजिक वणीकरण विभाग, तुळजापूर यांचे विद्यमाने कार्यक्रमाचे आयजोन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी व वृक्ष प्रेमी यांना हजर राहण्याचे आहवान करण्यात आले आहे.