उस्मानाबाद प्रतिनिधी –
सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दि. ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) भरण्याची मुदत आहे. परंतु दि. २८ च्या सायंकाळ पासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण आदी काही तांत्रिक अडचणी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्या बाबीचा विचार करून इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) पारंपरिक पद्धतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दि. ३०/१२/ २०२० रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ११/१२/२०२० रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दि. २३ / १२/ २०२० ते ३०/१२/२०२० असा आहे. या कालावधीत संगणकप्रणालीद्वारे एकूण ३,३२,८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. मात्र दि. २८ च्या सायंकाळ पासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण आदी काही तांत्रिक अडचणी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्या बाबीचा विचार करून इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) पारंपरिक पद्धतीने (offline mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दि. ३०/१२/ २०२० रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वरील निर्णयाच्या अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणपत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी तसेच पारंपारिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये RO Login मधून भरून घेण्यात यावे असे आदेश मंगळवारी ( दि.२९) रानीआ/ ग्रापंनी – २०२०/ प्र. क्र.०१ / का – ८ या पत्रान्वये दिले आहेत. या पत्रावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची स्वाक्षरी आहे.