निवडणुकीत मतदारांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन प्रत्येक उमेदवारांकडून दिले जाते. परंतु निवडून आल्यावर ते आश्वासन पूर्ण केले जाईलच याची काहीच गॅरंटी नसते. परंतु सास्तुर गणात सध्या आशादायी चित्र दिसून येत आहे. नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी मतदारसंघातील अडीअडचणी सोडविण्याचा चंगच बांधला असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील सास्तुर गणाच्या पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी निवडणुकीपूर्वी तीन चार महिन्यापासूनच या मतदारसंघात संपर्क वाढवला होता. नागरिक, महिलांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता तर त्या या गणाच्या सदस्या आहेत. निवडून आल्यावर तात्काळ त्यांनी त्यांच्या गणातील विविध गावात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. यावेळी नागरिकांकडून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, निराधार महिलांच्या पगारी वेळेवर करणे, गावात सार्वजनिक ठिकाणी हायमस्ट लॅम्प उभारणे, पाणीपुरवठा, स्मशानभूमीत असलेल्या समस्या, घरकुल, तरुणांना रोजगाराच्या संधी आदी अनेक प्रश्न त्यांच्यासमोर नागरिकांनी उपस्थित केले. प्रगती घोटाळे यांनीही त्या सर्व समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी तात्काळ पाठपुरावा सुरू करू असे आश्वासन दिले. तसेच याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनद्वारे संपर्क साधून समस्या सोडविण्यासाठी सांगितल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशितोष देशमुख, दीपाली देशमुख, उमेश देशमुख, सुरेखा पोतदार, सास्तुरचे उपसरपंच सलमान सवार यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला सदस्या असूनही प्रगती घोटाळे यांनी मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.








