Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती – तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/01/2025
in आपला जिल्हा
A A
0
पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती – तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल
Ad 10

धाराशिव – उत्तरप्रदेशातील चार तरुणांनी ११ देशांमध्ये पायी यात्रा करीत तब्बल ४.४८ लाख किलोमीटर इतका प्रवास करून त्यांनी धाराशिव शहरात प्रवेश केला.२९ जानेवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन या यात्रेची माहिती त्यांना दिली.
पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना साडेपाच लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. बुधवारपासून दोन दिवस पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण पुढील प्रवासास निघाले आहेत. २००१ पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप,महेंद्र प्रताप,गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांची टीम आता २० सदस्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांतून पादाक्रांत करीत आहे. साडेपाच लाख किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या कार्यात जराही खंड पडू द्यायचा नाही असा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
सन १९८० पासून त्यांचे गुरू अवध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात ६०० ठिकाणी १४.५० कोटी वृक्ष लागवड केली आहे.पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा- मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा व स्वच्छ भारत मिशन असा त्यांच्या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे. १९८० मध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या महापुरात त्यांच्या गुरुंना वडाच्या वृक्षाने आधार देऊन वाचवले होते. तेव्हापासून वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रचारार्थ ते जगभरात पायी प्रवास करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात जनजागृती करीत असताना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या तरुणांनी जिल्ह्याच्या विविध भागांत फिरून पर्यावरण विषयक जनजागृती केली आहे. त्यांच्या आवाहनाला साद देत हे तरुण ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहेत. या तरुणांनी ११ देशांचा दौरा केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनाबरोबरच हे तरुण पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा – मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा,पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन आदींची जनजागृती शाळा-महाविद्यालयांमधून करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

विश्वभ्रमंतीसाठी निघालेला हा चमू सध्या धाराशिव जिल्ह्यात पोहोचला आहे. बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या मिशन संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना अवगत केले. जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी त्यांचे कौतुक करीत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी सचिन ओंबासे
Previous Post

साठवण तलावातील पाणी शेतीसाठी बंद केल्या प्रकरणी परवानाधारक शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Next Post

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग
आपला जिल्हा

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

14/04/2025
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;  आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड
आपला जिल्हा

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ७ गुन्हे उघड

08/04/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने
आपला जिल्हा

राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार; पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने

27/03/2025
Next Post
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506726

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!