Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती – तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/01/2025
in आपला जिल्हा
A A
0
पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती – तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल

धाराशिव – उत्तरप्रदेशातील चार तरुणांनी ११ देशांमध्ये पायी यात्रा करीत तब्बल ४.४८ लाख किलोमीटर इतका प्रवास करून त्यांनी धाराशिव शहरात प्रवेश केला.२९ जानेवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन या यात्रेची माहिती त्यांना दिली.
पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना साडेपाच लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. बुधवारपासून दोन दिवस पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण पुढील प्रवासास निघाले आहेत. २००१ पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप,महेंद्र प्रताप,गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांची टीम आता २० सदस्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांतून पादाक्रांत करीत आहे. साडेपाच लाख किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या कार्यात जराही खंड पडू द्यायचा नाही असा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
सन १९८० पासून त्यांचे गुरू अवध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात ६०० ठिकाणी १४.५० कोटी वृक्ष लागवड केली आहे.पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा- मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा व स्वच्छ भारत मिशन असा त्यांच्या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे. १९८० मध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या महापुरात त्यांच्या गुरुंना वडाच्या वृक्षाने आधार देऊन वाचवले होते. तेव्हापासून वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रचारार्थ ते जगभरात पायी प्रवास करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात जनजागृती करीत असताना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या तरुणांनी जिल्ह्याच्या विविध भागांत फिरून पर्यावरण विषयक जनजागृती केली आहे. त्यांच्या आवाहनाला साद देत हे तरुण ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहेत. या तरुणांनी ११ देशांचा दौरा केला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनाबरोबरच हे तरुण पर्यावरणाचे रक्षण करा,झाडे लावा,पृथ्वी वाचवा,नद्यांचे संरक्षण करा,मुली वाचवा – मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा,पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन आदींची जनजागृती शाळा-महाविद्यालयांमधून करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

विश्वभ्रमंतीसाठी निघालेला हा चमू सध्या धाराशिव जिल्ह्यात पोहोचला आहे. बुधवारी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या मिशन संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना अवगत केले. जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी त्यांचे कौतुक करीत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी सचिन ओंबासे
Previous Post

साठवण तलावातील पाणी शेतीसाठी बंद केल्या प्रकरणी परवानाधारक शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Next Post

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's