मुंबई :
राज्यात मागील दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली होती. किमान तापमान पंधरा अंशांच्या पुढे गेले होते. मात्र बुधवारपासून पारा घसरला असून आगामी आठवडाभर विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रसह कोकणात थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्यात बुधवारी पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा अर्धा ते एक अंशाने घसरण झाली. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि विदर्भातील जिल्ह्यात थंडीत वाढ होणार आहे. विदर्भ वगळता मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानही एक ते दोन अंशाने वाढणार आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज नाही. तसेच धुकेही असणार नाही.