वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तीन दिवस विविध प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्राध्यापिका धृती माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला असे प्रतिपादन प्राध्यापिका धृती माने यांनी केले.