Vartadoot
Wednesday, January 28, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भारतीय संविधान हा भारतीयांचा आदर्श ग्रंथ….. प्रा. डॉ. महेश मोटे

admin by admin
27/11/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा :
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यास प्राधान्य देऊन सामाजिक समतेवर आधारित मानवतावादी जीवन मूल्यांची जोपासना करणारा भारतीय संविधान हा भारतीय नागरिकांचा आदर्श ग्रंथ असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा राज्यशास्त्र अभ्यासक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मांडले.
उमरगा तालुक्यातील येळी येथील भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालयात आयोजित ७३ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त शनिवारी (दि. २६) रोजी भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र कांबळे हे होते. यावेळी संस्थेचे संचालक बब्रुवान औटे, राजेंद्र किरकोळ, पत्रकार योगेश पांचाळ, अमोल कटके, भैय्यासाहेब मुजावर, बालाजी आंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, भारतीय संविधान हा एक सामाजिक दस्तऐवज असून भारतीय जनता हाच संविधानाचा मुख्य स्त्रोत आहे. संविधान हा केवळ कायदा किंवा नियम यांचा केवळ एक संच नाही तर स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेल्या मूल्यांचा आणि डॉ. बाबासाहेब यांच्या मुलभूत चिंतनाचा तो एक महत्वपूर्ण अविष्कार आहे. भारतीय संविधानात अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट व सर्वसमावेशक असे बनलेले आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला असतानाही इथे एकात्मता टिकून आहे ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळेच असे ते मत त्यांनी मांडले. अध्यक्षीय समारोपात महेंद्र कांबळे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे ती केवळ संविधानामुळेच म्हणूनच या भारतीय संविधानाची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी या संविधानाचे वाचन केलेच पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश टोपगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार राजेंद्र पटवारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने गावातील पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: व्याख्यानसंविधान दिन
Previous Post

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून साजरा करण्यात येणार

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू – आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू - आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's