भातागळी गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे समजताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी तात्काळ स्वखर्चाने बोअरवेल घेण्याचा निर्णय घेतला. या बोअरवेलला चांगल्या प्रमाणात पाणी लागले असून यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नतालुक्यातील भातागळी येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याचे काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी भातागळी येथे एक बोअरवेल घेण्यात आली. विशेष म्हणजे या बोअरवेल ला चांगल्या प्रमाणात पाणी लागले आहे. यामुळे गावातील पाणीप्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे. महेश देशमुख यांनी स्वखर्चाने भातागळी गावात आणखी एक बोअरवेल व १०० एचपीचे दोन ट्रान्सफॉर्मर देण्याचे आश्वासन दिले आहे. हेही काम पुढील काही दिवसांत केले जाणार असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले. बोअरवेलमुळे पाणीटंचाईच्या समस्येला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील असे आश्वासन महेश देशमुख यांनी दिले आहे.

तीन दिवसांपूर्वी भातागळी गावात बोअरवेल घेतेवेळी युवक काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे, उपाध्यक्ष संग्राम जगताप, लोहारा शहराध्यक्ष रौफ बागवान, गोपाळराव पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी आंनदगावकर, हनुंमत जगताप, युवराज पाटील, सत्यवान पाटील, दत्तात्रय जगताप, योगेश जगताप, अमोल ओवांडकर, अजित जगताप, अनंत जगताप, पृथ्वीराज जगताप, उमाकांत पांचाळ, अविनाश जगताप, धनंजय जगताप, बालाजी आनंदगावकर, दत्तात्रय आनंदगावकर, दाजी आंनदगावकर, दिलीप जगताप, मनोज जगताप, अप्पासाहेब कारभारी, पवन जगताप, सागर आंदगावकर, पृथ्वीराज जगताप, मुकुंद जगताप, दत्तात्रय फतेपुरे, बळवंत जगताप यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







