Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्राची व महापुरुषांची ओळख नसलेला राज्यपाल मोदींनी आपल्याला भेट दिला – डॉ. श्रीपाल सबनीस

admin by admin
10/01/2023
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्ये अनेक पुढारी करत आहेत. ज्याला महाराष्ट्राची ओळख नाही असा राज्यपाल आपल्याला भेट देण्यात आली आहे अशी जोरदार टीका डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. ८) केली आहे.
लोहारा तालुक्यातील होळी येथे उमरगा लोहारा तालुका मातंग समाज लहुशक्ती यांच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र मातंग समाज लहु शक्तीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शिंदे, अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे, माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, ऍड. प्रभाकर लोंढे, शितल चव्हाण, राम चव्हाण, सतीश कसबे, सुखदेव होळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रंथदिंडी
या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने करण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावरील युवक, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील युवती उपस्थितांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सुखदेव होळीकर यांनी केले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवराना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

साहित्य संमेलन
यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचे प्रचंड मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासाठी अनेक महापुरुषांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु सध्या काय सुरू आहे. राजकारणातील अनेक पुढाऱ्यांकडून महापुरुषाबद्दल चुकीची वक्तव्ये करून त्यांची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्र एक व्हावा, महाराष्ट्राने भारताचे नेतृत्व करावे अशी परंपरा आहे. परंतु सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची ओळख नाही, महापुरुषांबद्दल माहिती नाही असा राज्यपाल मोदींनी आपल्याला भेट दिला आहे अशी जोरदार टीका यावेळी डॉ. सबनीस यांनी केली.

शोभायात्रा
या संमेलनात चार ठराव संमत करण्यात आले. महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटक सरकारला देणार नाही, महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाबद्दल जाहीर निषेध, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अण्णाभाऊना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा हे चार ठराव स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे यांनी मांडले. त्याला उपस्थितांनी पाठिंबा दिला. यावेळी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार, सुरेश वाले, बसवराज वरनाळे, प्रा. व्यंकटेश कसबे, रंजना हासुरे, लोकजागर सांस्कृतिक मंचाचे पवार सर यांच्यासह होळी व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनासाठी सरपंच सरोजा बिराजदार यांच्यासह युवराज कोकाटे, ओम बिराजदार, संजय बिराजदार, बालाजी मडोळे, लक्ष्मण राठोड, राम जाधव, दत्ता गायकवाड, बालाजी सरवदे, प्रताप होळीकर, बालाजी बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. प्रा. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: डॉ. श्रीपाल सबनीसमहाराष्ट्रराज्यपाल
Previous Post

मुंबई येथील मोर्चा संदर्भात लोहारा शहरात लिंगायत समन्वय समितीची बैठक

Next Post

हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी – लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी - लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's