लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रमातून शनिवारी (दि.२३) वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. अंत्ययात्रेसाठी सदर उपक्रम लाभदायी ठरणार आहे.
पुनर्वसित गावातील स्मशानभूमीचे अंतर जास्त असल्याने अंत्यविधीसाठी होणारी अडचण दूर व्हावी या उद्देशाने सास्तुर व परिसरातील नागरिकासाठी नहुष राहुल पाटील यांच्या तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शनिवारी (दि.२३) या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी हर्षद कोकणे, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, यशवंत कासार, दौलत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी घनश्याम कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य, उत्तम क्षीरसागर, राजवर्धन पाटील, कविता चिवरे, दिपाली देशमुख, अशरफबी शेख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रविकरण बनसोडे, अप्पाराव कुर्ले, लाईक कादरी, शशिकांत पाटील, हर्षद पाटील, शिवराज सडू, दयानंद सडू, गुरुलिंग औसेकर, शांतेश्वर दलाल, अनिल पोतदार, महावीर कासार व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील नागरीक उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा पाटील यांनी स्वखर्चाने हा उपक्रम सुरू केला आहे.








