वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलीस ठाण्याच्या परिसरातील घडलेल्या अपघातातील, गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत असे आवाहन पोलिस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केले आहे.
लोहारा परिसरात घडलेल्या अपघातातील, बेवारस स्थितीत आढळून आलेली, विविध गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धूळखात पडली आहेत. अपघातातील दुचाकी ४८, चारचाकी ४ असे वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. तसेच बेवारस आढळून आलेली वाहनेही आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे लोहारा पोलीस ठाण्यात घेऊन येऊन वाहनांची ओळख पटवून घेऊन जावीत असे कळविण्यात आले आहे. सदरील वाहने येत्या सात दिवसांत घेऊन न गेल्यास वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे.