माजी विद्यार्थी व शिक्षकांनी स्थापन केलेल्या विद्या विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक तथा लेखक, साहित्यिक बाबुराव पिराजी माळी यांनी लिहलेल्या आपला सतेश्वर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व मानव विकास बहुद्देशीय केंद्राचे उदघाटन शनिवारी (दि.२०) तालुक्यातील जेवळी येथे होणार आहे.
डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू करावयाच्या डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास बहुद्देशीय केंद्राचे उद्घाटन व डॉ. सत्येश्वर पाटील यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तालुक्यातील जेवळी येथे होणार असल्याची माहिती लोहारा हायस्कूल शाळेची माजी शिक्षक तथा लेखक बाबुराव माळी यांनी दिली. मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील गरजवंत गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे कार्य विद्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून केले जाते. विद्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले असून अनेक विद्यार्थी आज आयटी क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहेत.
तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उज्वल भविष्यासाठी ग्रामीण भागात विद्या विकास प्रतिष्ठान याचे रोपटे सुरू करण्यासाठी लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक तथा लेखक बाबुराव माळी यांच्या पुढाकाराने तालुक्यातील जेवळी या गावामध्ये सुरू केले जात आहे. या मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात उभारी मिळू शकेल असा विश्वास बाबुराव माळी यांनी व्यक्त केला. या उद्घाटन व प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शांतप्पा धरणे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रविकांत पाटील, विश्वास धुमाळ,
डॉ. राजेंद्र घुली, डॉ. जलील मुजावर, रामराव काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी पाच ते सात या वेळे मध्ये होणार आहे. स्मृती चौक, जेवळी येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास लोहारा हायस्कूल शाळेचे आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक, लेखक, साहित्यिक बाबुराव माळी यांनी केले आहे.