लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात टोरंट या पवनचक्की कंपनीने व डेव्हलपर कंपनी सिमेंश गमेशा या कंपन्यांनी पाटबंधारे विभागाचे कुठलीही परवानगी न घेता धोकादायकरीत्या उच्च दाब असलेली विद्युत वाहिनी साठवण तलावाच्या परिसरात उभा केल्यामुळे तलावातील पाण्यात करंट उतरून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे निवेदन स्वराज्य पक्षातर्फे पाटबंधारे विभागाला दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी पाणी वापरासाठी जमिनी दिलेल्या असताना त्या जमिनीचा वापर व्यावसायिक उत्पादन करणाऱ्या टोरंट या कंपनीच्या माध्यमातून अनधिकृत पोल उभा केले आहेत. या पोलमुळे साठवण तलावाच्या पाळूस धोका निर्माण झाला असून तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. अनुरुद्ध असलेले पोल तात्काळ स्वरूपामध्ये काढून टाकण्यात यावेत अन्यथा १० मे रोजी उपविभागीय पाटबंधारे विभागाच्या लोहारा येथील कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन व त्याच दिवशी हिप्परगा येथील साठवण तलावात जलसमाधी घेण्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, संजय मुरटे, बालाजी मुळे, ज्ञानेश्वर मोरे, नितीन मुळे, महेश सुतार, शेतकरी शिवाजी लकडे, राजाभाऊ मुळे, शिवा पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.