मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये सन २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुर्षदपूर येथे १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करुन काम न करता बील उचलण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी बील उचलले असून प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. सरपंच / ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संगनमताने बील उचलण्याचा प्रकार घडला आहे. तरी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत अधिकारी यांची बदली करण्यात येवून नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी समितीमार्फत चौकशी करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर शेखर पाटील यांची स्वाक्षरी आहे.







