लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. या महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखा – ९९.२१ टक्के, वाणिज्य शाखा – ९१.८३ टक्के तर कला शाखेचा निकाल ८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातील संध्या हुलगुंडे हिने ८५.६७ टक्के गुण मिळवत प्रथम तर अंकिता कदम हिने ८४.१७ टक्के हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या महाविद्यालयातील १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे सचिव तथा शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.
शाखानिहाय निकाल –
विज्ञान शाखा –
प्रथम – देवकन्या जाधव – ७८ टक्के
द्वितीय – वैशाली वाघमारे – ७६.८३ टक्के
तृतीय – ईश्वरी पाटील – ७६ टक्के
कला शाखा –
प्रथम – तैसीन हेड्डे – ८३.५० टक्के
द्वितीय – माहेश्वरी माने – ८० टक्के
तृतीय – यश कांबळे – ७८.८३ टक्के
वाणिज्य शाखा –
प्रथम – संध्या हुलगुंडे – ८५.६७ टक्के
द्वितीय – अंकिता कदम – ८४.१७ टक्के
तृतीय – तृप्ती शिवकर – ८१.६७ टक्के